रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर यांच्यामध्ये होणा-या शिक्षक प्रशिक्षण कराराचे हस्तांतरण

 जिल्हा परिषद कोल्हापूर ,रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, कोल्हापूर यांच्यामध्ये होणा-या शिक्षक प्रशिक्षण कराराचे हस्तांतरण आज दिनांक 15/09/2017 इ. रोजी शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. जिल्ह्यातील किमान 10 हजार शिक्षकांना टेक्नोसेव्ही प्रशिक्षण व ज्ञानरचनावादी साहित्यनिर्मिती तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात ऊल्लेखनीय कामगिरी करणा-या शिक्षकांचा रोटरी व इनरव्हील तर्फे *नेशन बिल्डर पुरस्कार* देऊन गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडीक व अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक, रोटरी प्रांतपाल श्री. आनंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सीईओ डॉ. श्री. कुणाल खेमनार, शिक्षण समिती सभापती श्री. अंबरीषसिंह घाटगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इंद्रजित देशमुख, शिक्षण उपसंचालक श्री. मकरंद गोंधळी, प्राचार्य DIECPD     श्री. आय. ई. शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी      श्री. किरण लोहार, श्री. प्रसन्न देशिंगकर तसेच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ करवीर, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज चे सर्व पदाधिकारी, रोटरीचे सर्व सहाय्यक प्रांतपाल, शिक्षक वर्ग तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात खासदार श्री. धनंजय महाडीक, सौ. शौमिका महाडीक, सीईओ डॉ. श्री. कुणाल खेमनार, प्रांतपाल श्री. आनंद कुलकर्णी, श्री. अंबरीषसिंह घाटगे यांनी रोटरीच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात असेच मौलीक उपक्रम जिल्हा परिषदेच्या सोबत करून समाजाला प्रेरित करावे असे नमूद केले. प्रास्ताविक श्री. प्रसन्न देशिंगकर यांनी सादर केले. आभार श्रीमती रितू वायचळ यांनी मानले.

 

                                                                                             श्री. सुभाष चौगुले

                                                                                      शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

                                                                                      जिल्हा परिषद, कोल्हापूर

स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी अभियान – जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा व लघुपट स्पर्धेचे निकाल जाहिर

 

केंद्र शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी अभियान अंतर्गत  निबंध स्पर्धा व लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता सहाय्य संस्था,यांचेकडून निर्देश देण्यात आले होते.याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत या दोन्ही स्पर्धांचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून आयोजन करण्यात आले होते.जिल्हास्तरावर प्राप्त  निबंध आणि लघुपट यांचे परिक्षण जिल्हास्तरावर करण्यात आले असून या स्पर्धांचा निकाल जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीमध्ये दि.11/8/2017 रोजी घोषित करण्यात आला असून,या स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे –

स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी -निबंध  स्पर्धा – जिल्हास्तर निकाल
अ.क्रविजेत्या र्स्प्धकाचे नावप्राप्त क्रमांकगट
1कु.ऋ शिकेश दत्तात्रय पाटीलप्रथम क्रमांकप्रथम गट
2कु.विवेक उत्तम तळवार,मा.श्री.आण्णासाहेब डांगे कॉलेज,हातकणंगलेव्दितीय क्रमांक
3कु.काजल बबन पाटील,माध्यमिक विद्यालय,शेळोशी,गगनबावडातृतीय क्रमांक
4श्री.कपिल साताप्पा पाटील,प्रा.शिक्षक,न.पा.शिक्षण मंडळ,कागलप्रथम क्रमांकव्दितीय गट
5प्रियदर्शनी प्रकाश भोसले,हलकर्णी,ता.चंदगडव्दितीय क्रमांक
6प्रथमेश सतीश पाटील,तृतीय क्रमांक
स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी – लघुपट  स्पर्धा – जिल्हास्तर निकाल
1अरूण कृष्णा काशिद,संतमळा,इचलकरंजी,हातकणंगलेप्रथम क्रमांकव्दितीय गट
2प्रसाद महेकर,कोल्हापूरव्दितीय क्रमांक
3बी.के.पाटील,येळवण जुगाई,कोल्हापूरतृतीय क्रमांक

वरील विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरावर दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांकास रू.15हजार,सन्मानचिन्ह व पारितोषिक,व्दितीय क्रमांकास रू.10 हजार ,सन्मानचिन्ह व पारितोषिक व तृतीय क्रमांकास रू.5 हजार सन्मानचिन्ह व पारितोषिक दिले जाणार आहे.या विजेत्या स्पर्धकांची नावे,निबंध आणि लघुपट राज्यस्तरावरती सादर केली असून प्रत्येक जिल्हयातील तीन विजेत्या स्पर्धकांपैकी राज्यस्तरावर तीन विजेते निवडले जाणार आहेत.कोल्हापूर जिल्हयातून वरील सर्व स्पर्धक हे राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र ठरले आहेत.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत व नैदानिक चाचणी सन 2017-18

शिक्षण हक्क कायदयातील कलम 29(2)(ह) नुसार मूल्यमापन पध्दतीद्वारे विदयार्थ्यांच्या ज्ञान, आकलन आणि उपयोजन क्षमतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. कायद्यातील या अपेक्षा आणि तरतुदी विचारात घेऊन दिनांक 20 ऑगस्ट 2010 च्या शासन निर्णयानुसार राज्यात इयत्ता 1 ली ते 8 वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पध्दती लागू केली आहे.

वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या मुलभूत क्षमतांची परिपूर्ण तयारी झाल्यास          ज्ञानग्रहन आणि आकलनाचा मार्ग सुलभ होतो. यामध्ये एकही मुल अप्रगत राहू नये यासाठी संपूर्ण राज्यात प्रत्येक विदयार्थ्याच्या पायाभूत संपादणूकीची नियमित पडताळणी करुन शैक्षणिक दर्जा ंउंचावण्यासाठी गरजाधिष्ठित कृती कार्यक्रमाची आखणी करणे तसेच ज्या इयत्तेत बालक शिकत आहे त्या इयत्तेच्या क्षमतांचीही संपादणूक वेळच्या वेळी तपासून व मदत करून अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राज्यामध्ये सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणेत आला आहे. त्यांतर्गत सन 2017-18 मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित या विषयाच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करणेत आले आहे. यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 या तीन चाचण्यांचा समावेश आहे. सर्व नियमित विद्यार्थ्यांच्या किमान अपेक्षित क्षमता संपादणूकीची खात्री करणे व गुणवत्ता तपासणे आणि सुधारणे हा या चाचण्यांचा हेतू आहे.

सन 2017-18 मध्ये इयत्ता 2 ते 8 साठीची पायाभूत चाचणी सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमधील इयत्ता 2 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेणेत येत आहे. तसेच इयत्ता 9 वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी (राज्य मंडळ) संलग्नित असलेल्या राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता 9 वी तील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेणेत येत आहे. सदर चाचण्यांचे आयोजन राज्यस्तरावरुन प्रश्नपत्रिका पुरवून दिनांक 7 व 12 सप्टेंबर 2017 या कालावधीत खालीलप्रमाणे करणेत आले आहे.

 

इयत्ताविषयदिनांकवेळ
इ. 2 री ते इ. 9 वीप्रथम भाषा7 सप्टेंबर 2017सकाळी 11.00 ते 1.00
इ. 2 री ते इ. 9 वीगणित8 सप्टेंबर 2017सकाळी 11.00 ते 1.00
इ. 3 री ते इ. 9 वीइंग्रजी (तृतीय भाषा)11 सप्टेंबर 2017सकाळी 11.00 ते 1.00
इ. 6 वी ते इ. 9 वीविज्ञान12 सप्टेंबर 2017सकाळी 11.00 ते 1.00

 

.  जिल्ह्यातील 3595 शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेणेत येत आहे. यामध्ये एकूण 413970 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. तर जिल्ह्यातील 858 शाळांमध्ये नैदानिक चाचणी घेणेत येत आहे. यामध्ये एकूण 61114 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत.

सदर चाचणी आयोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांना कळविणेत आले आहे. चाचणीमधील लेखी प्रश्नाबरोबरच तोंडी, प्रात्यक्षिक इतर दिवशी घेण्याबाबतचे नियोजन शाळास्तरावर करणेत येणार आहे. सदर पायाभूत चाचणीचे शाळास्तर संनियंत्रण करणेसाठी जिल्हास्तरावरून 12 अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे.

श्री. सुभाष चौगुले

                                                                                        शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

                                                                                         जिल्हा परिषद, कोल्हापूर

जिल्हा शिक्षक पुरस्कार 2017 वितरण कार्यक्रम संपन्न

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दि. 5 सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करणेत येतो. या दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 20 गुणवंत शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार 2017 ने सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट शैक्षणिक कामकाजाबद्दल 2 शिक्षकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम मंगळवार दिनांक 05 सप्टेंबर 2017 इ. रोजी दुपारी 3.00 वा. राजर्षि शाहू सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आयोजित करणेत  आला होता.

सदर कार्यक्रम मा. सौ.शौमिका महाडिक, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अध्यक्षेखाली व मा. आमदार श्री.सुरेश हाळवणकर, मा.आमदार श्री.चंद्रदीप नरके यांच्या शुभहस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.

प्रास्ताविकामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.सुभाष चौगुले, यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती विद्यार्थी गुणवत्ता, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंमलबजावणी व शाळांच्या गुणवत्तेच्या संदर्भात सर्वंकष आढावा सादर केला.

कार्यक्रमाच्या मनोगतामध्ये सभापती अर्थ व शिक्षण, मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे यांनीजिल्हा परिषदेच्या 100% शाळा डिजिटल करणेचा संकल्प व्यक्त केला. तसेच जिल्हा परिषदेमार्फत स्वत:चे सॉफ्टवेअर विकसित करुन सर्व शाळांना पुरविणेत येईल असे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सुजाण विद्यार्थी अभियान राबविणेत येणार असलेचे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील शिक्षणातील गुणवत्तेचा उहापोह करत विद्यार्थी विकासामध्ये शिक्षकांचे महत्व विषद केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी बहुमोल योगदान देण्याचे आवाहन केले.

मा.आमदार चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यामध्ये नवनवीन उपक्रम राबविले जातात, शिंगणापूर क्रीडा प्रशाला ही राज्यामध्ये आदर्श प्रशाला म्हणून काम करीत आहे. तसेच शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करणेसाठी व शाळांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करु असे सांगितले.

मा. आमदार श्री.सुरेश हाळवणकर यांनी पुरस्काराने व्यक्तीचा सन्मान होतो, अधिक प्रेरणेचे काम करण्याची ऊर्जा मिळते.जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा पुरस्कार म्हणजे गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा गौरव आहे. राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षकाचं योगदान मोलाचे आहे याची जान ठेवून प्रत्येक शिक्षकाने उत्कृष्ट कामकाज करुन बलशाली, सामर्थ्यशाली भारत घडविणेच्या दृष्टीने योगदान दयावे, तसेच डॉ.राधाकृष्णन, डॉ.जे.पी.नाईक या सारख्या विचारवंताचे विचार आचरणात आणावेत असे सांगितले. तसेच शिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना व कामकाजाबाबत आपण समाधानी असलेचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणामध्ये मा. सौ.शौमिका महाडिक, अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थी गुणवत्ता, शिक्षकांचे राष्ट्र उभारणीमधील योगदान यांचे महत्व विषद करुन शिक्षक पुरस्कार निवडीवेळी जिल्ह्यामध्ये शिक्षक ज्ञानदानामध्ये त्यागवृत्तीने उत्कृष्ट योगदान देत असलेबद्दल दिसून आले याबद्दल समाधान व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी मा.श्री.सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष, जि.प.कोल्हापूर, मा.श्री.विशांत महापुरे, समाजकल्याण सभापती, मा.श्री.सर्जेराव पाटील (पेरीडकर), बांधकाम सभापती, मा.सौ.शुभांगी शिंदे, महिला व बालकल्याण सभापती, मा.श्री.इंद्रजित देशमुख, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व सन्माननिय जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

                                             

कृषि विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरद्वारे कृषि दिनानिमित्त्य  वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालेबाबत

मा. कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त्य  कृषि विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत आज कृषि दिन संपन्न झाला. सदर कार्यक्रमानिमित्त्य मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील यांच्या शुभ हस्ते  मा. कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले. तसेच मा. नाईक यांच्या कार्याविषयी मा. इंद्रजीत देशमुख साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे व्याख्यान झाले. सदर कार्यक्रमाकरिता विभागीय कृषि सहसंचालक मा. डॉ. एन. टी. शिसोदे  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा. श्री. बसवराज मास्तोळी यांच्या सोबत जिल्हा परिषदेकडील सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी तस्ेाच कर्मचारी उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद जुन्या इमारतीच्या आवरात वृक्षारोपण कार्य्रकम घेणेत आला. मा. अध्यक्ष सौ शौमिका अमल महाडिक, मा. उपाध्यक्ष श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील , मा. श्री. विशांत सुरेश महापुरे सभापती समाजकल्याण, मा.श्री राहुल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी सभापती हातकणगले राजेश पाटील, मा. इंद्रजीत देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. चंद्रकांत सुर्यवंशी कृषि विकास अधिकारी, मा. चंद्रकांत वाघमारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी   (सा. प्र.)  मा. राजेंद्र भालेराव उपमुख्य कार्यकारी अधिकारी  ( ग्रा. पं. ) मा. श्री. सतिश रोकडे जिल्हा कृषि अधिकारी  मा. दिनेश वरपे जिल्हा कृषि अधिकारी  यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

Sd/-

कृषि विकास अधिकारी

जिल्हा परिषद, कोल्हापूर

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कंत्राटी पद्धतीने गट समन्वयक पदाची भरती

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा  परिषद कोल्हापूर येथे कंत्राटी पद्धतीने गट समन्वयक  पदाची भरती 

गरोदर माता, तिव्र – मध्यम कुपोषीत बालके व विकलांग रुग्ण यांच्याकडे पुरपरिस्थीतीत विशेष लक्ष देणार, तसेच आवश्यकता भासल्यास स्थलांतर करणार व साथरोग नियंत्रणासाठी कोल्हापूर जिल्हयातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज नागरिकांनी लाभ घ्यावा. – सौ. शौमिका महाडीक, अध्यक्षा, जि.प.कोल्हापूर

उपरोक्त विषयास अनुसरुन कोल्हापूर जिल्हयामध्ये पुरपरिस्थीती करीता आपत्कालीन व्यवस्थापन पुढीलप्रमाणे करणेत आले आहे.

  • जिल्हास्तरावर डॉ कुणाल खेमनार, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आपत्कालीन कक्ष सुरु ठेवणेत आलेला असुन त्यामध्ये डॉ प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ यु जी कुभांर, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी व जिल्हा मुख्यालयातील 25 कर्मचारी 24 तास नियंत्रण कक्ष सुरु केला हा कक्ष 1 जुन ते 2 ऑक्टोंबर 2017 अखेर कार्यरत राहणार.
  • तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विस्तार अधिकारी आरोग्य, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक / सेविका, बी एन ओ, यांचा समावेश असुन हा कक्ष 24 तास कार्यरत करणेत आलेला आहे.
  • प्राथमीक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. आरोग्य सेवक / सेविका / सहायक यांच्यावरती जबाबदारी निश्चीत करणेत आलेल्या असुन त्यानुसार जिल्हास्तरावरुन सनियंत्रण करणेत येत आहे.
  • जिल्हयातील एकुण 129 पुरग्रस्त गावे व 210 जोखीमग्रस्त गावातील सर्वाना आपत्कालीन काळात औषधोपचार करणेबाबत पुर्ण नियोजन करणेत आले असुन त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.
  • संभाव्य पुरग्रस्त गावासाठी एकुण 59 वैद्यकिय अधिकारी, 64 आरोग्य सहायक, 85 आरोग्य सेवक, 103 आरोग्य सेविका असे मिळुन 311 अधिकारी कर्मचारी यांना पुरग्रस्त गावासाठी आदेशीत करण्यात आले आहे. तसेच आद्यावत वाहन व औषधे इत्यादी वैद्यकिय पथकात सामावेश करण्यात आलेला आहे. व अशा तयार केलेल्या पथकांची माहिती कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी पदाधिकारी व संबधित कार्यालये यांना देण्यात आलेली आहे.
  • प्रत्येक प्रा.आ.केद्रे व उपकेद्र स्तरावर आवश्यक तो जलजन्य व किटकजन्य औषध साठा पुरेशा प्रमाणात पाठविणेत आलेला असुन शासनाच्या मार्गदर्शनक सुचनानुसार साथरोग नियंत्रण किट अद्यावत करणेत आले आहे. तसेच संभाव्य पुरपस्थिती उदभवल्यस जिल्हयातील संपर्क तुटणाऱ्या प्रा.आ.केंद्र अंगर्तत गावासाठी अतिरिक्त दोन ठिकाणी अतिरिक्त औषधसाठा ठेवण्यात आलेला आहे.
  • पुरग्रस्त भागातील तिव्र जोखीम गट  –
अ.क्रं.तालुकाबाळंतपणाची अपेक्षित तारीखजोखीम बालकेअतिगंभिर रुग्णाची संख्या अपंग, पॅरालेसे, दिर्घकाळ अंथरुनात असणारी
जुनजुलैऑगस्टसप्टेंबरएकुणसॅममॅम
1भुदरगड454518000
2 बावडा362314000
3पन्हाळा1820171267030
4शाहुवाडी101057320013
5हातकणंगले14815617517064911011
6करवीर45104116112377437
7कागल44343046154214112
8शिरोळ1932592582799891235222
9राधानगरी1821141770006
कोल्हापूर48361562165123701965371

वरील गटासाठी सर्व घटकांची वैद्यकिय अधिकारी आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत नियमित तपासणी करण्यात येऊन आवश्यकता भासल्यास तात्काळ पुरग्रस्त गावाबाहेर सुरक्षित स्थळी हलवणे बाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे.

  • पूरग्रस्त, संभाव्य पुरग्रस्त व संपर्क तुटणा-या गावंाना आरोग्य सेवक /सेविका,आरोग्य सहाय्यक/सहाय्यीका व वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत दैनंदिन भेट देवून साथीच्या रोगाचे रुग्ण निदर्शनास आलेस त्वरीत जागेवरच उपचार करणेत येणार आहेत. तसेच आरोग्य सेवक / सेविका व आरोग्य सहाय्यक / सहाय्यीका यांनी आपल्या भेटीत पिण्याचे पाणी ग्रामपंचायतीद्वारा नियमित शुध्दीकरण केले जाते किंवा नाही याची खातरजमा करुन रजिस्टरला नोदी घेवून संबधीत पाणी पुरवठा संस्थेला वस्तुनिष्ठ माहिती निदर्शनास आणून देऊन त्यावरील तंात्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
  • पुरग्रस्त गावासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कोल्हापूर यांचेकडील फवारणी पथकाची फवारनीसाठी आवश्यकता असेल त्यावेळी फवारणीची कारवाई करणेत येईल.
  • प्रत्येक वैद्यकिय पथकाकडे पुरेसा औषध साठा ठेवणेत येतो व ज्यात्या ग्रामपंचायतीकडे पुरेश्या प्रमाणात ब्लिचिंगपावडरचा साठा असलेची खात्री करणेत येते.
  • प्रा.आ.केंद्राचे कक्षेतील पुरग्रस्त गावात किंवा कोणत्याही साथीचा उद्रेक झालाच तर आपण प्रतिबंधात्मक उपचार युध्द पातळीवर करुन साथ आटोक्यात आनणेसाठी प्रयत्नशील राहणेत येते त्यासाठी आपल्या तालुक्यातील संपर्क अधिकारी व वैद्यकिय मदत पथक यांची जरुरीनुसार मदत घेणेसाठी संपर्क साधण्यात येतो.
  • पावसाळा सुरु होणेपुर्वी साथरोगाच्या दृष्टीने जोखमीच्या गावांना किमान महिन्यातुन एक भेट देवून परिस्थीतीचे अवलोकन वैद्यकिय अधिकारी यंाचे मार्फत करण्यात आलेले असुन योग्य पाठपुरावा करण्यात येत आहे.
  • प्राथमिक आरोग्य केद्रांचे वाहन यंत्रणा, साहित्य साधन सामुग्री सुसज्य ठेवणेत येते.
  • जिल्हयातील एकुण 34 ठिकाणी 108 आपत्कालीन आरोग्य सेवा पथक सुसज्ज ठेवण्यात आले आहे.
  • याशिवाय बाहय जिल्हयातील सांगली, बेळगाव इ. आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क ठेवुन भौगोलीक परिस्थीतीनुसार रुग्णावर उपचार करणेत येणार आहेत.

याव्यतिरिक्त पुरपरिस्थीतीमध्ये ग्रामीण भागातील नागरीकांना अडचण आलेस जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडील दुरध्वनी क्रमांक 0231-2661653 तसेच प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.

श्री सर्जेराव पाटील,

उपाध्यक्ष

जिल्हा परिषद कोल्हापूर

डॉ कुणाल खेमनार, (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापूर

सौ.शौमिका महाडीक,

अध्यक्षा

जिल्हा परिषद कोल्हापूर

डॉ प्रकाश पाटील,

जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापूर

 

श्री चंद्रकांत वाघमारे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)

जिल्हा परिषद कोल्हापूर

 

श्री सर्जेराव पाटील,

सभापती

बांधकाम व आरोग्य

जिल्हा परिषद कोल्हापूर

 

बाल न्याय अभियान कार्यशाळा बाबत

मुलांची काळजी व संरक्षण यासाठीच्या बाल न्याय अधिनियमासंदर्भात शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर व स्वाभिमानी बाल हक्क अभियान यांचेवतीने दि.०५/०७/२०१७ रोजी जुने सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विशेष कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मुलांचे हक्क आणि अधिकार या विषयी सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांना सविस्तर माहिती देणेत आली. मुलांच्या हक्काची जाणीव करुन देवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात नियमित करणेच्या व शाळाबाह्य विद्यार्थीविरहीत कोल्हापूर जिल्हा निर्माण करणेच्या उद्देशाने ही कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण व अर्थ समिती सभापती मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.श्री.सुभाष चौगुले, अवनिच्या उपाध्यक्षा मा.श्रीम. अनुराधा भोसले यांचेसह शिक्षण विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री.सुभाष चौगुले यांनी समाजातील शेवटचा विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी काम करणेचे तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देणेची गरज असलेचे स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.कुणाल खेमनार यांनी आजचे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांना सुजाण नागरिक बनविण्यासाठी आत्तापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत नाही, मुले घरी सुरक्षित असतात असे गैरसमज दूर होवून पालक व समाज यांच्यामध्ये जाणीव जागृती करणेची गरज असलेचे सांगितले. शाळाबाह्य विद्यार्थीविरहीत कोल्हापूर जिल्हा निर्माण करण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करणेचे आवाहन केले. यावेळी शिक्षण व अर्थ समिती सभापती मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे यांनी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्नांव्दारे सर्व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी व जिल्हा परिषदेच्या शाळा समृद्ध करणेसाठी सहकार्य करणेचे आवाहन केले.

बाल न्याय अधिनियमासंदर्भात अवनि संस्थेच्या उपाध्यक्षा मा.श्रीम.अनुराधा भोसले यांनी सविस्तर माहिती दिली. यामध्ये मुलांचे चार प्रकारचे अधिकार- जगण्याचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार, विकासाचा अधिकार व सहभागितेचा अधिकार तसेच शोषण व त्याचे प्रकार याबाबत मार्गदर्शन केले. विविध चित्रफितींव्दारे शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाबाबत केलेल्या कार्याची माहिती दिली. जिल्हा नियोजन समिती व शिक्षण विभागाच्या सहकार्यामुळे वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणासाठी वाहतूक व्यवस्थेव्दारे नियमित उपस्थिती राखता आलेबाबत समाधान व्यक्त केले.

आभार उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री.बी.एम.कासार यांनी मांडले.

सदरची कार्यशाळा यशस्वी होणेकरिता श्री.डी.डी.कुंभार, श्री.बी.बी.पाटील, श्रीम.जे.एस.जाधव, श्री.व्ही.एस.वर्मा, श्री.आर.एम.धनवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

                                                                                                                                                शिक्षणाधिकारी(प्राथ.)

                                                                                                                                                जिल्हापरिषद कोल्हापूर