दिव्यांग बालकांसाठी मोफत साहित्य साधने वाटप व शिष्यवृत्ती गुणत्ताधारक विद्यार्थी सत्कार समारंभ

केंद्रशासनाच्यासर्वशिक्षाअभियानकार्यक्रमांतर्गतसमावेशितशिक्षणउपक्रमांतर्गतदिव्यांगविद्यार्थ्यांनाअनेकसुविधामोफतपुरविणेतयेतात.विशेषगरजाधिष्ठीतअसणायामतिमंद,बहुविकलांग,सेरेब्रलपाल्सी,अस्थिव्यंग,कर्णबधिरवअंधअसलेल्याविद्यार्थ्यांनासुलभपणेवर्गातबसतायेईल,शालेयपरिसरातवदैनंदिनपरिसरातकार्यकृतीकरणेकरीता,अध्ययनप्रकीयासुलभहोईलअशीआवश्यकसाहित्यसाधनेविद्यार्थ्यानासर्वशिक्षाअभियानअंतर्गतपुरविणेतयेतात.

सन2016-17मध्येकेाल्हापूरजिल्हयातीलप्रवर्गनिहायदिव्यांगविद्यार्थ्यांचीमोजमापशिबीरामधूनअलिम्कोतज्ञांमार्फततपासणीकरुनविशेषगरजाअसणा-या(दिव्यांग)561विद्यार्थ्यांना738साहित्यसाधनेनिश्चितकरणेतआलेलीआहेत. या साहित्यच्या वितरणाचा शुभारंभगुरूवारदिनांक 06 जुलै 2017 रोजीदुपारी 1.00 वाजताराजर्षिशाहूछत्रपतीसभागृहजिल्हापरिषद, कोल्हापूर येथे करणेत आले. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या जिल्हायतील 56 विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित  सत्कार करणेत आला. या संयुक्त कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक, उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. इंद्रजित देशमुख, शिक्षण व अर्थ समिती सभापती मा. श्री. अंबरिषसिंह घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मा. सौ. शुभांगी शिंदे,  जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. एल. एस. पाटील, डीआयईसीपिडी चे प्राचार्य मा. डॉ. विलास पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. चंद्रकांत वाघमारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा. श्री. सुभाष चौगुले,  यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरू  डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना निसर्गाने अन्याय न करता जे व्यंग दिलेले आहे त्या मोबदल्यात एक असामान्य शक्तीही दिलेली असते. या जाणिवेतून समाजातील घटाकांनी या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. त्या विद्यार्थ्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी  सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, व उच्च शिक्षा अभियानाच्या एकत्रित संयोगातून विकास साधता येईल असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रू.42 लाख किमतीचे साहित्य वाटप केलेचे सांगितले. कोल्हापूर जिल्हयाने शिष्यवृत्ती परीक्षेत 56 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल स्थान पटकावलेचे सांगितले. यावेळी शिक्षण सभापती श्री. अंबरिषसिंह घाटगे, अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी आपल्या मनोगतात शिक्षण विभाग राबवित असलेले उपक्रम व शाळांची गुणवत्ता याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट केन, डायसी प्लेअर, सीपी चेअर, एम.आर. किट, व्हिलचेअर, श्रवणयंत्र, ब्रेल कीट या साहित्याचे वितरण करणेत आले. तसेच शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करणेत आला.

शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                         जिल्हापरिषद,कोल्हापूर

दिव्यांग बालकांसाठी मोफत साहित्य साधने वाटप व शिष्यवृत्ती गुणत्ताधारक विद्यार्थी सत्कार समारंभ

केंद्रशासनाच्यासर्वशिक्षाअभियानकार्यक्रमांतर्गतसमावेशितशिक्षणउपक्रमांतर्गतदिव्यांगविद्यार्थ्यांनाअनेकसुविधामोफतपुरविणेतयेतात.विशेषगरजाधिष्ठीतअसणायामतिमंद,बहुविकलांग,सेरेब्रलपाल्सी,अस्थिव्यंग,कर्णबधिरवअंधअसलेल्याविद्यार्थ्यांनासुलभपणेवर्गातबसतायेईल,शालेयपरिसरातवदैनंदिनपरिसरातकार्यकृतीकरणेकरीता,अध्ययनप्रकीयासुलभहोईलअशीआवश्यकसाहित्यसाधनेविद्यार्थ्यानासर्वशिक्षाअभियानअंतर्गतपुरविणेतयेतात.

सन2016-17मध्येकेाल्हापूरजिल्हयातीलप्रवर्गनिहायदिव्यांगविद्यार्थ्यांचीमोजमापशिबीरामधूनअलिम्कोतज्ञांमार्फततपासणीकरुनविशेषगरजाअसणा-या(दिव्यांग)561विद्यार्थ्यांना738साहित्यसाधनेनिश्चितकरणेतआलेलीआहेत. या साहित्यच्या वितरणाचा शुभारंभगुरूवारदिनांक 06 जुलै 2017 रोजीदुपारी 1.00 वाजताराजर्षिशाहूछत्रपतीसभागृहजिल्हापरिषद, कोल्हापूर येथे करणेत आले. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या जिल्हायतील 56 विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित  सत्कार करणेत आला. या संयुक्त कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडिक, उपाध्यक्ष मा. श्री. सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. इंद्रजित देशमुख, शिक्षण व अर्थ समिती सभापती मा. श्री. अंबरिषसिंह घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती मा. सौ. शुभांगी शिंदे,  जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. एल. एस. पाटील, डीआयईसीपिडी चे प्राचार्य मा. डॉ. विलास पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. चंद्रकांत वाघमारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा. श्री. सुभाष चौगुले,  यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरू  डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना निसर्गाने अन्याय न करता जे व्यंग दिलेले आहे त्या मोबदल्यात एक असामान्य शक्तीही दिलेली असते. या जाणिवेतून समाजातील घटाकांनी या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. त्या विद्यार्थ्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी  सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, व उच्च शिक्षा अभियानाच्या एकत्रित संयोगातून विकास साधता येईल असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रू.42 लाख किमतीचे साहित्य वाटप केलेचे सांगितले. कोल्हापूर जिल्हयाने शिष्यवृत्ती परीक्षेत 56 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल स्थान पटकावलेचे सांगितले. यावेळी शिक्षण सभापती श्री. अंबरिषसिंह घाटगे, अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी आपल्या मनोगतात शिक्षण विभाग राबवित असलेले उपक्रम व शाळांची गुणवत्ता याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट केन, डायसी प्लेअर, सीपी चेअर, एम.आर. किट, व्हिलचेअर, श्रवणयंत्र, ब्रेल कीट या साहित्याचे वितरण करणेत आले. तसेच शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करणेत आला.

शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

                                                                         जिल्हापरिषद,कोल्हापूर

विभागीय कार्यशाळेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कामाची प्रशंसा – विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी

मा.श्री.चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त, पूणे विभाग,पूणे यांनी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल उपक्रम राबविणेसाठी विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पूणे व सोलापूर या पाचही जिल्हा परिषदेमधील सर्व विभागात व सर्व पंचायत समिती मधील सर्व कार्यालयात यशस्वीपणे राबविणेसाठी शनिवार दिनांक -15 जुलै,2017 रोजी  मुख्य सभागृह विभागीय आयुक्त कार्यालय,पूणे येथे सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक,खाते प्रमुख्य,सर्व गटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी व कक्ष अधिकारी,अधिक्षक यांची एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती.

मा.विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत दळवीसो यांनी सदर कार्यशाळेत त्यांनी यापूर्वी कार्यरत असतांना जिल्हाधिकारी, पूणे,सहकार आयुक्त, या ठिकाणी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल उपक्रम कश्या पध्दतीने राबविले याची सविस्तर माहिती  व  अभियान यशस्वी केलेची माहिती दिली, तसेच आता विभागीय आयुक्त कार्यालय पूर्ण व त्याअंतर्गंत सर्व जिल्हाधिकारी ते तलाठी कार्यालयापर्यंत व जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व कार्यालयात हे अभियान राबविणेबाबत पॉवर प्रेझेंटेशनव्दारे सादरीकरण करुन सविस्तर माहिती देवून उपस्थित केलेल्या शंकाचे सुध्दा निरसन केले.सदर अभियानाचा पहिला टप्पा हा अभिलेख वर्गीकरण अद्यावत करतांना   प्रलंबित कामाचा शोध घेवून  प्रलंबीत कामे निश्चित करुन  अभिलेख वर्गीकरण  अ,ब,क व ड मध्ये करुन अभिलेख कक्षामध्ये योग्य प्रकारे अभिलेखांची मांडणी दिनांक-31 जुलै 2017 पर्यंत पूर्ण करणेबाबत,तदनंतर प्रलंबित कामाची (संदर्भाची) निश्चिती करावी  व ते विहित कालावधीत निर्गत होणेकरीता नियोजन करणेबाबत सूचना दिल्या.

सदर कार्यशाळेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ सुंदर अभिलेख कक्ष अभियान हे एप्रील 2017 पासून जिल्हा परिषदेमधील सर्व विभागात व सर्व पंचायत समित कार्यालयात सुरु करणेत आले व याबाबत जिल्हा परिषदेने व पंचायत समितीने आतापर्यंत केलेल्या अभिलेख वर्गीकरणाची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पॉवर      प्रेझेंटेशनव्दारे कार्यशाळेत सादरीकरण केले तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी(साप्र)      चंद्रकांत वाघमारे यांनी अभिलेख वर्गीकरण करतांना गठ्ठा कश्याप्रकारे बांधावा याबाबत व्हिडीओ क्लिपव्दारे सविस्तर माहिती दिली.

मा.विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद राबवित असलेल्या स्वच्छ सुंदर अभिलेख कक्ष  कार्यालय अभियानाचे कौतुक करुन पुढील कामास शुभेच्या दिल्या. कार्यशाळेस कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) खातेप्रमुख्य, सर्वगटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी,कक्ष अधिकारी व अधिक्षक उपस्थित होते.

राजर्षि छत्रपति शाहू पुरस्कार वितरण समारंभ- दि.16 जुलै 2017

कोल्हापूर जिल्हा आणि छ.शाहू महाराज यांचे नाते अत्यंत दृढ आहे.  छ.शाहू महाराजांनी आपल्या अल्प कारकीर्दीत जे अलौकिक कार्य केले, ते सर्वांनाच सतत प्रेरणा देत राहिले आहे.  त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.  या योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यन्त पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी सर्वच जण आपापल्या परीने कार्यरत असतात.  त्यांच्या प्रयत्नांना दाद म्हणून त्यांतील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांना छ.शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2000 पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांमधून 5 व अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून 15 जणांची निवड त्यासाठी करण्यात येते.  पुरस्कारांसाठी निवड करतांना, सन्माननीय सदस्य यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कार्याचा विचार केला जातो.  कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 वर्षांची सेवा, गोपनीय अभिलेख, त्यांचे जनता, लोकप्रतिनिधी आणि सहकाऱ्यांशी असलेले साहचर्याचे नाते, याच बरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वा कलाक्षेत्रातही उल्लेखनीय योगदान असेल तर त्याचाही विचार करण्यात येतो.  अशा रीतीने पारख करून पुरस्कारांसाठी योग्य अशा सदस्य व कर्मचाऱ्यांची निवड करण्याचा प्रयत्न होतो.

सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ  असे पुरस्काराचे स्वरूप असून, चालू वर्षीही 5 सन्माननीय सदस्य व 15 कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामानिमित्त, मा.ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  सदस्य व कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्याचा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

संक्षिप्त माहिती शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत

संक्षिप्त माहिती शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत            

प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत खालील नमूद केलेल्या तालुकयामधील शाळा निर्लेखन करावयाच्या आहेत. संबधित लिलाव नोटीस व लिलावापासूनची सर्व कार्यवाही तालुकास्तरावरून होणार आहे. यासाठी लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्यांनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पं. स., गटविकास अधिकारी पं. स, व उपअभियंता (बांधकाम ) पं. स.यांचेशी संपर्क साधावा.

अ.न.गटाचे नावशाळेचे नांवनिर्लेखन करावयाच्या शाळा खोली संख्यासरकारी किंमतएकूण तालुनिहाय सरकारी किंमत
1करवीरवि.मं.कुमार गांधीनगर 3 व स्ंाधिी कुमार गांधीनगर   ता. करवीर0939,110/-39,110/-

संबधित गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता (बांधकाम), गटविकास अधिकारी यांनी इकडून प्रसिध्द केलेल्या दिनांकानंतर एक महिन्यामध्ये शासन नियमांनुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण करणेची आहे.

                                                  sd/-                                                 

                                    मुख्य कार्यकारी अधिकारी                               

                                     जिल्हा परिषद, कोल्हापूर

जि.प. चा स्तुत्य असा ‘‘ पसायदान उपक्रम ’’

शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता ही त्रिसुत्री समाज विकासासाठी अत्यंत मुलभुत असुन त्याची पुर्तता करणेसाठी जि.प. च्या प्रयत्नांना आपल्या मदतीचे पाठबळ द्यावे आणि समाजऋणातून मुक्त होणेची संधी साधावी असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडीक यांनी CSR च्या बैठकीच्या वेळेस केली. निमित्त होते – जिल्हा परिषदेच्या राजर्षि शाहु सभागृहामध्ये ‘‘ CSR- उद्योजक सामाजिक उत्तरदायित्व ’’ च्या अनुष्‌ंगाने जि.प. मार्फत करणेत आलेली  ‘‘ पसायदान उपक्रमाची  ’’  सुरवात.

जिल्हा श्रेत्रात विविध विकासकामे, उपक्रम राबविताना शासन तथा जि.प. स्तरावरून निधी मिळणेकरिता अनेक मर्यादा असतात. तेव्हा ही तफावत दुर करणेसाठी विविध उद्योग, बँक तथा औद्योगिक निगम यांचेकडून CSR अंतर्गत निधी मिळवून त्यातून सामाजिक बांधिलकिची जपणूक करण्यासाठी एकूण 34 उद्यागसमुह तथा बँकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते.

समाजातील शेवटच्या घटकांना विकासाचा लाभ मिळवून देण्यासाठी CSR-उद्योजक सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून प्रत्याक्षात आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या प्रसंगी केले. पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छाता विभाग तथा ग्राम पंचायत विभागामार्फत अपेक्षित उपक्रमांचे प्रेजेंटेशन करणेत आले. त्यावेळी इंडोकाउंट फाऊंडेशनचे श्री. देशपांडे यांनी 20 शाळांची जबाबदारी स्विकारली. आर. बी. एल. व आय. सी. आय. सी. आय. बँकेने डिजिटल ग्राम निर्मिती करीता योगदान देणेबाबत सुतोवाच केले. तर गोकुळ दुध संघामार्फत पश्‌ुसंवर्धन विभागाला व्हॅन देणेबाबत अभिवचन देणेत आले. या प्रसंगी घाटगे पाटील इंडस्ट्रिजचे श्री गिरीष श्रीखंडे, तसेच कॅनरा बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जि.प. कडील मक्तेदार श्री विजय भिके यांनी विद्यानिकेतन क्रिडा प्रशालेस पोषण आहार पुरविणार असलेचे सांगितले. एकूण सामाजिक भान व बांधिलकी जपणारा हा उपक्रम ‘‘ו֣Öê कमी तिथे †Ö´Æüß’’ ही भुमिका पार पाडणारा असलेने त्यास ‘‘¯ÖÃÖÖµÖ¤üÖ­Ö उपक्रम ’’†ÃÖê आभार प्रदर्शन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबोधले.

या कार्यक्रमास जि.प.च्या अध्यक्षा सौ. शौमिका अमल महाडिक मॅडम, उपाध्यक्ष              श्री सर्जेराव ज्ञानदेव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री इंद्रजीत देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, अर्थ व शिक्षण समिती सभापती श्री अंबरिषसिंह संजय घाटगे, समाजकल्याण समिती सभापती  श्री विशांत सुरेश महापुरे तसेच पक्षप्रतोद श्री विजय जयसिंग भोजे, भाजप गटनेते श्री अरूणराव जयसिंगराव इंगवले तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली बैठक.

दि.10/8/2017 रोजी पंचगंगा प्रदूषण व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संबधी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे मा. अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदरच्या सभेस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पा.व स्व.) जिल्हा परिषद, कोल्हापूर सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी व सर्व उपविभागाचे उप अभियंता, सर्व तालुक्याचे गट संसाधन केंद्र प्रतिनिधी उपस्थित होते. सदरच्या बैठकीचे प्रास्ताविक व बैठकीचे उद्देश मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा. व स्व.) यांनी विशद केला. सदरच्या बैठकीचे कार्यवृत्तांत पूढील प्रमाणे.

  1. प्रपत्र अ ब क व ड प्रमाणे सर्व्हेक्षण कामकाजाचा आढावा घेतला असता यापैकी करवीर व भूदरगड यांचेकडील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा सर्व्हेक्षण अहवाल अप्राप्त आहे. याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरचा सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
  2. सर्व्हेक्षण पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींचे अंदाजपत्रक तातडीने पूर्ण करावे यासाठी शासन निर्णयास अनूसरून अंदाजपत्रक तयार करावीत यासाठी शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले. तसेच वैयक्तिक स्तरावरील शोषखड्डे व खतखडे्‌डे कामे नरेगा योजनेतून प्रस्तावित करावीत.
  3. गटविकास अधिकारी पन्हाळा व कागल यांनी नरेगा योजनेतून वैयक्तिक शोषखडा कामे घेण्यासाठी सूधारित आराखड्यास मंजूरी मिळणेबाबत मागणी केली.
  4. शाहूवाडी गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील वैयक्तिक पातळीवरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना नरेगा योजनेतून प्रस्तावित असल्याबाबतचा आढावा दिला.
  5. हातकंणगले गटविकास अधिकारी यांना नाबार्ड प्रकल्पासाठी जागा मागणीचे प्रस्ताव जिल्हा परिषद मार्फत मा. जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या.
  6. घनकचरा व्यवस्थापन बाबत विविध पर्यांयाची पडताळणी व माहिती घेणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले. तसेच SLRM साठी पोश्टर व लोगो तयार करण्याबाबत सूचित करून त्याबाबतच्या नवीन कल्पना असल्यास जिल्हास्तरावर सादर करण्याबाबत सूचित केले.
  7. गडहिंग्लज गटविकास अधिकारी यांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी पाणी वहनासाठी गटर आवश्यक असल्याचे सूचित केले त्यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बंदिस्त गटारांचा बृहत आराखडा तयार करण्याबाबत सूचित केले.
  8. उपअभियंता आजरा यांना उत्तुर ग्रा.पं. साठी बक्षिस रक्कमेतून वैयक्तिक शौषखड्डे करणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले.
  9. सर्व उपअभियंता व गटविकास अधिकारी यांना जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन स्थळ असणाऱ्या ग्रा.पं. च्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत विशेष लक्ष देण्याबाबत सूचित केले.
  10. राधानगरी उपअभियंता यांनी 8765 शोषखड्डे नरेगा योजनेतून प्रस्तावित केलेची माहिती दिली. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे नमूद केले यावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जास्तीत जास्त वैयक्तिक स्तरावरील उपाययोजना करणे व जागा उपलब्धतेचे सूक्ष्म नियोजन करण्याचे सुचित केले.
  11. तसेच पंचगंगा प्रदूषित न होण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत त्याचा सविस्तर अहवाल उप अभियंता यांनी सादर करण्याबाबत सूचित केले.
  12. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन बाबत आराखडे तयार करीत असताना निधीच्या मर्यादेत न राहता बृहत आराखडा तयार करावा व त्यानंतर सर्व योजनांचा convergence करून कामे पूर्ण होतील असे नियोजन करावे.
  13. मा. अध्यक्षा यांनी सर्व तालुक्यांनी भौगोलिक परिस्थितीनूसार नाविण्यपूर्ण काम करण्याबाबत सूचना केल्या तसेच SLRM बाबत गाव पातळीवर सर्व घटकांचा सहभाग घेण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणेबाबत सूचित केले. तसेच याबाबत काम करीत असताना शासन सुचनांच्या पलीकडे जावून आदर्श काम करून लोकांची मानसिकता बदलण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात यावे.

वरील प्रमाणे मुद्दयांची सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पा.व स्व.) यांनी आभार व्यक्त करून सभा संपलेचे जाहिर केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, कोल्हापूर.

महिलांसाठी आरोग्य शिबीर

कोल्हापूर जिल्हा परिषद, महादेवराव महाडिक फौंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी, ग्रामपंचायत मोरेवाडी, रंगनाथ हॉस्पीटल, तसेच देवराई संस्था यांचे संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबीर ग्राम पंचायत मोरेवाडी येथे आयोजित करणेत आले होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ.शौमिका अमल महाडिक यांचे शुभ हस्ते करणेत आले. महिला ही सतत घरातील इतरांसाठी राबत असते. जोपर्यंत मोठा  आजार होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा करीत असते. ही मानसिकता महिलांनी आता बदलली पाहिजे व महिलांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यामागचा मूळ हेतू असा होता की, काही प्राथमिक आजार हे पहिल्या टप्प्यातच निदर्शणास यावेत यासाठी विविध ठिकाणी या पुढेही महिलांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन करणेत येणार आहे याचा सर्व महिलांनी  लाभ घेणेत यावा असे आवाहन मा.अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांनी या प्रसंगी केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे, डॉ. प्रविण हेंद्रे, डॉ. सौ. अनुराधा सामंत, करवीरचे प्र.गट विकास अधिकारी श्री. भोसले, श्री. दत्तात्रय भिलुगडे, सौ.स्मिता हुदले, श्री. मनोज बागे, श्री. आशिष पाटील, आरोग्य सहाय्यक कर्मचारी व मोरेवाडी भागातील मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.